शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९

मातीच सूत्र ..

प्रभाव ना मजवर कुणाचा
मी न कुणाचा मानसपुत्र आहे !!
त्यांच्यात अन् माझ्यात असेल
तर माती हे एकच सूत्र आहे !!
-उषातनय

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २००९

सारं काही मनासारख ..

पाहीजे तितक नभातून पाणी पडतच अस नाही

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

सर्वच गोष्टी त्यासाठी जुळून याव्या लागतात

आशेसाठी अनेक निराशा गिळून घ्याव्या लागतात

पहील्याच प्रयत्नात पाखरू उडतच अस नाही !!

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

मनाला लागून आपण एवढ घ्यायच नसत

मागच विसरून सार पुढ पुढ जायच असत

हव तितक रसीकाला गाण भिडतच अस नाही !!

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

घडल नाही मनासारख मन एकट होऊन जात

त्या एका पारव्या सारख दुःखी राहून गात

ठोकलेल प्रत्येक दार उघडतच अस नही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
असूनही सार काही जीवन घडतच अस नाही !!
मग नसल काही तर काही बिघडतच असनाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
पाहीजे तितक नभातून पाणी पडतच अस नाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
-उषातनय

देवा ..!!

देवा !!
तू असशील लक्ष्मी -
तर सोन्याची नाणी दे ,
पोटासाठी !!
देवा !!
तू असशील नभ -
तर मनसोक्त पाणी दे ,
ओठासाठी !!
देवा !!
तू असशील शब्द -
तर गोड गोड गाणी दे ,
चित्तासाठी !!
-उषातनय

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २००९

मी वृत्तांना ..

भावनांच्या चालीवर शब्दांना प्रवृत्त केलं !!
मी व्याकरणातल्या वृत्तांना निवृत्त केलं !!
-उषातनय

तिचा वळिवाचा पाऊस ..

ती जेव्हा हसायची , गोड दिसायची !
वाटायचा तो वळिवांत न्हाला !!
पावसात भिजला , पावसात भिजला !!
हिरव्या त्या पात्यांपरी फिरूनी मातीत रुजला !
पावसात भिजला !!
कॉलेजात येताना ती सजायची ,
पाहून त्याकडे कशी लाजायची ,
गालातल्या गालात तोही हसायचा ,
मग तिच्यासाराखा तोही गोड दिसायचा -
शब्दप्रेरणा मानायचा तो तिजला !!१!! पावसात भिजला !!
तिच्याचसाठी कविता तो लिहायचा ,
प्रेमाने हृदयी तिच्या वहायचा ,
इतकी ती त्याच्या शब्दावरती मरायची ,
आत्म्यापासून वाह !अशी म्हणायची ,
समजायचा गालात तोही लाजला !!२!!पावसात भिजला !!
मना मोहणारा तिचा गंध तो ,
बनला त्याच्या कवितेचा छंद तो ,
सारखातो तिच्याकडे पहायचा ,
तो त्याच्यामध्ये कुठे रहायचा ?
हळू हळू तोही तिच्या प्रेमात पडला !!३!!पावसात भिजला !!
म्हणायचा तू डोळ्यांपुढती नसतांना -
दिसते माझी कविता मजसी रुसताना ,
विचारतो सखे माझी होशील का ?
शब्दांना सूर तुझा देशील का ?
जीवनातला हर्ष खरा आहे तू मजला !!४!! पावसात भिजला !!
साधं सुधं होतं ते कुणब्याच पोरं ,
लेक ती श्रीमंताची मोठं तीच ते घर !
परीस्थीती दोघांची नव्हती समांतर,
असे ते जन हो दोघात पडले अंतर ,
कवी तो फक्त तिच्या आठवांत जगला !!५!!पावसात भिजला !!
दुष्काळाला त्याच्या पर्जन्य होती ,
त्याच्या प्रतिभेसाठीचे चैतन्य होती ,
कशी ती सजणी त्याची त्याला भूलून गेली ?
संसारी तिच्या तीही रमून गेली -
पण प्रेम दिवा मनातील त्याच्या कधी न विझला !!६!!पावसात भिजला !!
ती जेव्हा हसायची ,गोड दिसायची -
वाटायचा तो वळिवांत न्हाला !!
हिरव्या त्या पात्यांपरी फिरूनी -
तोही जगत राहीला तोही उगत राहीला !!
--उषातनय

सोमवार, २३ फेब्रुवारी, २००९

रसीकांचा कवी..

परीक्षकांचा नाही मी तर रसींकांचा कवी आहे !!
असंख्य चांदण्यातला एकुलता एक रवी आहे !!
-- उषातनय

दोघांना ...

दोघांना एकमेकातले मित्र भेटवू !
डोळ्यातूनच आता प्रेम पत्र पाठवू !!
-- उषातनय

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २००९

ज्यावेळेस..

ज्यावेळेस माझे ओठ ,
माझ्या डोळ्यांची साथ देणार नाहीत -
त्यावेळेस मला कविता लिहीता येणार नाही !!
--उषातनय

अश्विनी आभाळ ...

अश्विनी आभाळ कुणाचं कुणाचं
दसर्याच्या सोन्याच , झेन्डूंच्या रानाच !
आभाळ अश्विनी नाखार्या ऊन्हाच ,
हसर्या पाण्याच , जान्भळ्या मनाच !
आभाळ अश्विनी तुम्बल तुम्बल -
कांद्याच्या वाफ्यातल्या पांण्यान चुम्बल!
आभाळ अश्विनी सजल उजल-
मातीत हिरव निळ पहा ते रुजल !
आभाळ अश्विनी चांदण चांदण -
बंधार्याच्या पाण्यात रातीला गोंदण!
आभाळ अश्विनी पिकांचा जड़े छंद-
पाझरे सईच्या डोळ्यातून आनंद !!
-- उषातनय

गं आई !

गं आई तुझ्या प्रेमाची किती आस आहे !
तू नसता यमाचाच प्रत्येक श्वास आहे !!
तुझा वात्सल्य चांद ना दिसला कधी -
लागले का त्याजला ग्रहण खग्रास आहे !!
बाळ तो तुझा राहतो उपाशी भुकेला -
हवासा तो भरविणार कोण घास आहे !!
आभाळ गेले पांगून नाही माती त्याची -
मिळणार सांग त्याला कुणाची कूस आहे !!
फसवीला जातोय पदोपदी जीवनी तो -
नात्यांवर जरी सर्वच ग विश्वास आहे !!
श्रावण त्याच्या आयुष्यातला संपूनी गेला ?
सारा दुर्दैवाचा त्याच्या दुष्काळ ख़ास आहे !!
-उषातनय

जांभळी पिकल्या सये..

जांभळी पिकल्या सये
वर नभी डोईवर
आनंदान मन माझं
होई कावरं बावरं !!
घोंगावतो झेपावतो
सोसाटून बाई वारा
जांभळाच्या आल्या कशा
गार बिलोरी त्या गारा !
झेलायला जांभळ ही
सये पदर तू धर !!
वाट वाट ही जांभळी
जांभळ्या ह्या दिनराती
जांभळी झाली फूल
अन् गवताची पाती !
विहीरही जांभूळली
झाली मधाळ वावर !!
पुरी जांभळाची झाली
सये मातीचीया कूस
गोड़ गोड़ साखरीचा
कसा फुललेला ऊस!
जांभळ ही चाखताना
डूले काटाळी बाभूळ !
आनंदान मन आता
माझं जांभूळ जांभूळ ! !
--उषातनय

मी पाण्याच्या ...

मी पाण्याच्या थेम्बापरी पडू कशाला ?
नाही काही माझे मग रडू कशाला ?
धाव घेती माझ्याकडे कोटी किरणे ती -
असूनी उजेड तमात दडू कशाला ?
रात जाईल तो दिवस येईल पुन्हा -
सुखाचे मग प्रेत करून गाड़ू कशाला ?
जीवन म्हणजे आहे नुसता प्रवास -
नसता कारण उगा लढू कशाला ?
देणगी निसर्गाची सौंदर्य आहे ती -
शोभत नसता मग मढू कशाला ?
प्रेमातच आहे मी देवही म्हणाला -
जगा अर्पीताना अवघडू कशाला ?
आलेलो रिक्त मी जाणार रिक्त मी -
हे आहे ते नाही म्हणून कुढू कशाला ?
-उषातनय

तसाच तो शेतकर्याच्या जातीतला ..

त्याच्या बाप दाद्याची नव्हती अशी काही दौलत ..
अन् त्याच्या जातीलाही ती मिळत नव्हती सवलत !
शिकत नव्हता शाळेत फार भाकरीची वण वण ..
अंगावर ठिगळचं नुसते .....लाज धरी त्याच मन !
शाळा सुटली ,पाटी फुटली , जगायच होत आयुष्य ...
दुष्काळलेलाच होता वर्तमान तसच राहील भविष्य !
स्वप्न एकही रंगल नाही कितीही त्यानं रंगवलं ...
नियतीनं पुन्हा पुन्हा आभाळ त्याचं पांगवलं !
सोडवला तरी होत होता पुन्हा नुसता गुंताच ...
जगत होता तो कसतरी घेऊनी चिंता खंताच !
पैसा मिळवण्यात त्याला काहीच यश आलं नाही ...
दारिद्र्य सुटलं नाही श्रीमंतीनं त्याला वशच केल नाही !
हळहळत ,तळमळत,धडधडत , राहीला त्याचा प्राण ...
डहाळून टाकल्या बाभळी तरी होत गेल बाभूळरान !
"तसाच तो होता एक शेतकर्याच्या जातीतला -
झालाच ना आभाळाचा आता नुरालाही मातीतला !!"
--उषातनय

पाटाला आलं पाणी ...

पाटाला आलं पाणी -
समाधानास्पद भाव मिळत राहिला कांद्याला ,
तर तोही जोडून घेणारय पुन्हा शेतकीच्या धंद्याला !!
---उषातनय

कवितेत काय ?

सारेच म्हणती
कवितेत काय ?
वेळ वाया जाय
फुकटचा !!
"सरस्वती आहे
ब्रह्म हे अनंत
देव भगवंत
वास करी !!
शोध ईश्वराचा
आहे ही कविता
कवी तुम्ही होता
समजेल !!
कळले तुकाला
ज्ञानाला कळले
'त्यांना 'आकळले
हो वि "ठ्ठ"ल !!
मोक्षाचे साधन
सोपे हो कविता
फिका हो सविता
तिजपुढे !!"
--उषातनय

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९

आवडते कवयित्रे..

थाटमाट नको हुंडा नको !
फक्त सुखान तू नांद !!
माझ्या कवितेला तू -
तुझ्या कवितेच ''तोरण'' बांध !!
--उषातनय

आपलेच दात आपलेच ओठ ..

हं ! आपलेच दात आपलेच ओठ ! !
तर मग आपल्याच दातांनी आपल्या ओठांच रक्त काढल्यावर -
आपल्या दातांच आपल्या ओठांशी ,
ख़रच रक्ताच नात आहे का ?
हां प्रश्न पडतो !! नाही का ?
-उषातनय

कशी झाली ....

कशी झाली बाई
वावराची कळा
कोरडा उन्हाळा
बरा होता !
जीवन एवढे
जिवासी उठावे
उन्हात पेटावे
हो त्यापेक्षा !
ऊन ते ऊनच
असते कोरडे
का हो पाणी गडे
घात करी ?
लाख लाख डोळे
ठेऊनी आकांक्षा
बघ ना रे दशा
धरणीची !
-- उषातनय

मी कुठेच ...

मी कुठेच आता जात- येत नाही !!
कवितेतून फारसा मोकळा होत नाही !!!
-- उषातनय

पाऊस पडतो बाई ...

पाउस पडतो बाई ,
वेडाऊनी धुवांधार !
नाही कुठे दिसे दिस ,
दाटे जगती अंधार !!
भिऊनिया तांडवाला,
त्या वाटाच थाम्बलेल्या !
जावे कुठे आता मग ,
पावसात तुम्बलेल्या !!
-- उषातनय

बुधवार, ११ फेब्रुवारी, २००९

ज़माना...

जमान्यानाच भरला माझ्यात द्वेष आहे !!
''प्रशांत '' नुरला आत ''अशांत ''शेष आहे !!
-- उषातनय

माझ्यासाठी कविता ...

कविता माझं व्यसन नाही
कविता माझं श्वसन आहे
जन्माच कारण माझ्या -
आयुष्याला पँशन आहे !!!
-- उषातनय

गायकी ..

जेव्हा जेव्हा कुणी माझी 'लायकी 'काढली होती -
तेव्हा तेव्हा माझी कविता 'गायकी 'वाढली होती !!!

---- उषातनय

आज पुन्हा...

आज पुन्हा पहिल्या भेटीचा होतोय आभास !
तसेच राणी पाठीवर सोड मोकळे केस !!
भिजलो होतो पावसात तूझ्या सवे हर्षाने ,
वाटे पुन्हा तो लागला प्रेमाचा श्रावण मास !!
धुंद रात होती ब्रह्म कमळाना बहर तो ,
आजही तो हुन्गू दे ब्रह्मकमळांचा सुवास !!
डोळयात पहा तू माझ्या मिसळूनिया डोळे ग ,
एकरूप होवू दे माझ्या श्वासाला तुझा श्वास !!
गुलाबाच्या छटा साऱ्या गालावर उमटू दे ,
लाजूनिया तशीच ग डोळयात गुलाबी हास !!
माझ्यासाठी ह्वावी तुझ्या केसांची घनेरी रात ,
स्वप्नातही फिरू दे हळू त्यांचीच मोरपीस !!
अल्गदची तू येना मग माझीया बाहूंत ,
अनूभऊ पुन्हा तो पहील्या भेटीचा पाऊस !!
--- उषातनय

मंगळवार, १० फेब्रुवारी, २००९

माझी कविता

ती काहींच्या' डोळयात ' येते माझी कविता !!
तरी रसीकांच्या 'गळयात' येते माझी कविता !!
----- उषातनय

विद्यापीठ !

कविते वरून घरात
ती होते हो कटकट !
आई बाप कवितेचे
तरी माझ्याविद्यापीठ !!
--उषातनय

ज्या मातीत ...

ज्या जन्मलो मातीत तिच्या
कणा कणा पासून बोलतो !
मी बोलतो तेव्हा
खोल खोल मना पासून बोलतो !!
-- उषातनय

बाबा मारू नका मला ...

तुम्हा वाटले जरी मी संकटांचा दंश आहे ,
बाबा ! मारू नका मला मी तुमचाच अंश आहे !
वाढणार मजमूळे ना तुमचा वंश आहे ,
भूषविणार जास्त मी तुमचा वन्श आहे !!
स्वतःहाच्या फूलाला कुस्कर्णार तुम्ही का ?
फूलान्वर तुमची हो किती माया आहे ,
जन्मा आधीच जीवन हे हिसकावणार का ?
लेक मी तुमची तुमचीच तर छाया आहे !!
बाबा तुम्ही ठेवाल तशीच राहीन मी
तुमच्या कल्याना आयुष्य वाहीन मी !
अंगनात जरी दुसर्याच्या फुलणार आहे ,
तिथे चांदने तुमचेच तर खुलानार आहे !
बाबा न्यारे सारे मला जग पहायचे आहे ,
ओझे तुमचे मला खरे वहायचे आहे !
हो झेप गरूडाची घेऊनी ऊड़ांयचे आहे ,
जिंकायचे आहे मला हो लढायचे आहे !!
बाबा ठरवा तुम्ही तारायचे की मारायचे आहे ,
मला खूप काही तुमच्यासाठी करायचे आहे !
गोड न्यारे सारे जग मला पण बघायचे आहे ,
बाबा ! मारू नका मला पण जगायाचे आहे !!
--- उषातनय

सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

विचारायच राहून ...

माझ्या वावरात नान्द्शील का?
विचारायच राहून गेल !!
पाणी पाणी येता येता शेतात
दुसरीकड़ वाहून गेल !!
हव तेंह्वा बार त्याला
फोड़ता आल नाही ,
हिरवळीशी नात कधी
जोङता आल नाही !!!
---उषातनय

पान पान ...

पान पान एक एक
गाळत राहीली बोर ,
आंसु तसा एक एक
ढाळत राहीली पोर !!
रणरणत्या ऊन्हासारख
तीच सासर भांडखोर ,
भेगाडलेली माती
न्याहाळाची पोर ----
कधी जमतील ढ़ग ?
कधी नाचेल मनमोर ??
---उषातनय

गुलाबास..

आज अंगणात कसा
बाई गुलाब फूलला ,
गार मखमली वारा
संगे घेऊनी झूलला !
गोंडस झाल्यावरती
छान माळीन केसात ,
सावल्या त्या राती जसा
तारा खुले आकाशात !!
पण म्हणते ते मन
तया छळवले किती
आज पर्यंत जीवन
त्याचे मजमूळे माती !!
मूका जीव तरी नित
माझ्यासाठीच झूरला
किती त्रासले तरी तो
जगी परार्थी उरला !!
आनंदात आज त्याला
राहू देइन फांदीशी ,
नाही तोडणार त्याला
नित तोड़ते हो जशी !!
असा गुलाब तो आता
फांदीवरती फुलेल ,
माझ्या केसान्वीन राती
चांदण्याशी तो बोलेल !!
सकाळी सकाळी दव
पान्घरील ती पाकळी
किरण तो गेल्यावर
कशी हसेल मोकळी !!
जेंव्हा थकून जाईल
हळू घेइन त्याजला
आता फेकन्या ऐवजी
छान ठेवीन उशाला !!
-- उषातनय

माझे लग्न ...

लग्न असेल माझे
नसेल गाजावाजा !!
तरी ती असेल राणी
आणि मी असेल राजा !!
----उषातनय

जीवनाकडून ..

जीवनाकडून मी शिकलो
उपयोगी नाही वाद !!
जगी या अमर ठरतो
तो प्रेमाचा संवाद !!
--उषातनय

शनिवार, ७ फेब्रुवारी, २००९

पानकळी रात ...

सूर्य पांघरून ओढी देई विजेची जांभई !!
पानकळी रात होई गरद जांभळी !!ध्रु !!
ढगांचा बिछाना त्यान पांघरले ढग
भास काळ्या मेंढयान्च्या लोकरिची रग
दिशा दिशा त्या सुर्याला गाते अंगाई !!१!!
अंगणात खेलत कस बागडत मूल
बांधावर गवत तस घेतया झूल
निम्बाच्या स्पर्शा आतुरल्या बाभळी !!2!!
पिम्पळाच्या कुशीत गात टपटप पान
मोहरली माती आनंदल सार रान
थेम्ब थेम्ब मातीतून चंदन उगळी !!३!!
खोद शाल तो कसा डोकावतो खाली
चोरट्या उन्हांत मातीला साद घाली
इंद्रधनुचे स्वप्न रंग सात ऊधळी !!४!!
रानी तू माझ्यासवे वावरात चल
ओन्जलित पावसाचे मोती तू झेल
बिलायताची रानातली माळ ना कळी !!५!!
बंधार्याकड़ कसा वहळ सुटला
झोपलेला सूर्य तिथ जांभळा भेटला
त्या भिजल्या चिंचा बोरी आणिक जांभळी !! ६ !!
--उषातनय







































कविता खोल खोल

आपल्या अस्तित्वाच्या भानातुन येते !
कविता खोल खोल मनातून येते !!
वातानुकूलित खुराड्याना ताला लावित
ती महानोर दादांच्या रानातून येते!!
आई प्रेम पान्हा तान्ह्याला पाजीते -
जीवनामृत दूध तिच्या स्तनातुन येते !!
सुखातून, दुःखातून , चिन्तनातुन येते
ती तर भोवातालाच्या जनातून येते !!
कविता खोल खोल मनातून येते !!
-- उषातनय

पिम्पळ

भलमोठ पिम्पळाच झाड़ तुटल ,
कौठीना रडू आल !!
पिम्पळावरल त्यांच प्रेम -
कौठातुनाच पडू आल !!

--- उषातनय

खस्ता...

तिला अनेकानि टाळल होत !
निसटायच धोरण पाळल होत !
हळहळताना !
धडपड़टाना !
खात असताना , खस्ता !
तीचा आत्माही म्हणतो आता !!
येइल त्याला घर ,जाइल त्याला रस्ता !!
-- उषातनय

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २००९

आठवणींची पीसे

वाट त्याच्या येण्याची पाहे पत्नी त्याची नटून !
केसाना गजरा ,लग्नाचा शालू ,भाली कुंकू थाटून !!
सिमेवरुन येणार होता देश रक्षिण्यास गेलेला ,
सोडून सारी नाती गोती पूरा देशाचा झालेला !!
पत्र धाडले होते त्याने परत घराकडे येण्याचे ,
दाराकडे नजर तिची ती चिह्न दिसेना येण्याचे !!
कड़ी वाजली दाराची जोरात पाय धावले
परकाच कोणी दारावरती "हे नाही का आले ?"
टेकून कागद हातावरती तो माघारी फिरला ,
होते लिहिले लढताना जवान शहीद जाहला !!
परतला नाही सिमेवरुन देशासाठी गेलेला ,
कोसळली ती दारात त्या कागद आसवानी ओला !!
मातिसाठी तिच्या कूंकवान केलि संसाराची होळी ,
सूखान रहा म्हणायचा लागेल ग कधीही गोळी !!
''म्हणू नको कधीही तू हे सखयावीण जगू मी कसे ?
जगण्या नवी उमेद देतील आठवणींची पीसे !! ''
------उषातनय

ती !!!

ती बिन्दास्त आहे ! जबर दस्त ,मस्त आहे !!
माझ्या प्रेम कवितांची तीच भिस्त आहे !!
----------उषातनय

मी कूठे

मी कुठे म्हणतो मला डावलण्यात आले !
मातीतुन कवितेसाठीच चालवण्यात आले !!
--- उषातनय

प्रेमाच नात

मी त्यांच्याकडे लापटासारखा जात नाही ,
मी त्यांच्याकडे कपटासारखा जात नाही ,
मी त्यांच्याकडे पोपटासारखा जात नाही,
मी त्यांच्याकडे रक्ताच्या नात्याहूनही-
घट्ट आप्ताच्या नात्याने जातो !!
कारण त्यांना माझ मन कळत !
माझ्या कवीतेला नव जीवन मीळत !!
असं त्यांच माझ प्रेमाच नात!!!
---------- उषातनय

बुधवार, ४ फेब्रुवारी, २००९

साराच दुष्काळ...

साराच दुष्काल होता जीकड़ तिकड़ ...
उजाड़ माती ऐस पैस होती ...!!
कुबेरासारख जगायच होत ...
आम्हाला का दिवस काढायची हौस होती ...?
_ उषातनय

सखीचे शब्द...

इतके तुझे शब्द भावतात मजला !
तेच पुन्हा लिहायला लावतात मजला !!
त्यांच्यातून होते आकाशात सैर !
मातिवरही तेच ठेवतात मजला !!
तेच पुन्हा लिहायला लावतात मजला !!
मन नभाला लागतात शब्दांच्या धारा !
शारदा गणेश का पावतात मजला !!
तेच पुन्हा लिहायला लावतात मजला !!
पुन्हा पुन्हा वाचतो मी माझ्याच कविता !
त्यातही तुझेच शब्द गावतात मजला !!
तेच पुन्हा लिहायला लावतात मजला !!
_ उषातनय

सर एकदा..

"पाहिलं नाही कधी
पहायचय देवाला!
सर! एकदा घेवून चला
कवितेच्या गावाला!!"
- उषातनय

चुकतं कुणाचं...?

..... ज्याच्या त्याच्या ठिकाणी
सर्वचबरोबर असतात !
..... तर मग चुकतं कुणाचं ?
.....नक्की कुणाचं ?
माझं ...?
तुमचं...?
त्यांचं...?
...की देवाचं...?
नक्की कुणाचं...?
उत्तर -
ना माझं,
ना तुमचं,
ना त्यांचं,
ना देवाचं !
चुकतं ते -
उद्भवलेल्या परिस्थितीच...
त्या त्या वेळ आणि क्षण यांचं...
चुकतं ते परिस्थितीच...
नाही का ?
_ उषातनय

कॉलेजात आवडली...

कॉलेजात आवडली त्याला एक मुलगी होती..

तरीही त्यान तिच्याशी केली ना दिल्लगी होती !!

दुरूनच न्याहाळायचा तो तीच निखळ हसणं ..

बोलण्याचीही ठेवली ना तिच्याशी सलगी होती !!

समजत नव्हते काही, गुंतत होता तिच्यात ..

बनत होती की काय त्याची ती जीवलगी होती !!

वाटायचे खुप त्याला की बोलावे सारे मनातले ...

पण गरिबाचा लेक तो ती श्रीमंताची मुलगी होती !!

- उषातनय

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २००९

आपण

आपल्याच माणसांना

टाळत असतो आपण !

परक्याना जाउन

मिळत असतो आपण !!

परक्याना कितपत

कळत असतो आपण !!

तेव्हा आपल्याच मात्र

आकळत नसतो आपण !!!

_उषातनय

त्या आंब्याच्या पानावरति



त्या आंब्याच्या पानावरति ऊन नाचते बाई!!

दौड़त येतो वारा संगीत साचते बाई!! ध्रु!!

पहा कशी चमचम चमकू लागली पाने

नाद मधुर नाजुकसे घूमू लागली गाणे

शब्द उमटले सोनेरी ते मीच वाचते बाई!!१!!

पानांच्या कुशीत कसा मोहोर निजलेला

अंग अंग वारा पुराची गंधुंनी गेलेला

माझ्यासवे का आम्रतरुला गाणे सुचते बाई ? !!२!!

हिरव्या या वृक्षाने न्यारी सजली धराही

झुलत्या पानांची कशी झूलती तर्हाही

कंचन हिरवे रूप तरुचे सर्वाना रुचते बाई !!३!!

त्या आंब्याच्या पानावरति ऊन नाचते बाई!!
दौड़त येतो वारा संगीत साचते बाई !!

_उषातनय

बाभळी दोन

रानाच्या वाटावर उभ्या बाभळी दोन ...

सदा पाहत बसती येत-जात कोण कोण !!

_ उषातनय

स्मशान

येताना जाताना रस्त्याने स्मशान दिसते...

'कुठे चालला तू?' यायचे इथेच हसते !!!

_ उषातनय

सूर्य जिंकुन ये

सूर्य जिंकुन ये !

चंद्र जिंकुन ये

स्वर्गासाठी तुझ्या

इन्द्र जिंकुन घे !!ध्रु!!

कोर कोर सखे

नभ जिंकुन ये

तिथं लिहायला

समुद्र जिंकुन घे !!१!!

दिशा जिंकुन ये

निशा जिंकुन ये

चांदण्यानाच तू

त्या लपेटून घे !!२!!

निळं हिरवं
तू

रान जिंकुन ये

जाशील जिथं तू

मन जिंकुन ये!!३!!
_ उषातनय

पान कळयात

पान कळयात चिपाडातुन थेम्ब थेम्ब गळत असे
तेव्हा त्याच्या दुष्कालाचा अर्थ त्याला कळत असे...
_ उषातनय

पाउस येईल ...

या धरणीला सांगा ना रे पाउस येईल !!
ती जांभळी मैफिल मालकंस गाईल !!ध्रु!!
रुसवा सोड धरे कोपु नको आम्हावरी
आभाळी भरल्या पहा श्रावणी चिम्ब सरी
गारव्याचा तुजसाठी बाहुपाश देईल!!१!!
थेम्ब थेम्ब येईल असा मयूर नाचे जसा
सुगन्धुन वाराही हुरुपेल वेडा नि पिसा
डोळ्यातल्या आसवांना संगतिस नेईल !!२!!
ते डोंगर हिरवे पहा झाड़ झाड़ हिरवे
रुसलेले आनंदून जातील सारे पारवे
गवतांचा नि दवांचा मधुमास राहिल !!३!!
सुमनांचे अलंकार वेलींची मोहनमाळ
किरणांनी हळव्या चमकेल तुझे भाळ
'त्याच्या' सवे नाह्ण्याची तिचीही हौस होईल !!४!!
उत्साहाच्या भरात थकवा जाइल तुझा
तुला फूलवाया येणार अम्बराचा तो राजा
वाहणारे सारे पाणी पुरावा ठोस राहील !!५!!
_ उषातनय


रविवार, १ फेब्रुवारी, २००९

ज्योतिबा सावित्री

लेक शिकली शिकली
उजळल्या सर्व रात्रि !
देश ज्योतिबा ज्योतिबा
झाला सावित्री सावित्री !!
_ उषातनय

ओपन मधला दलीत...


रोज रोज स्वप्नांचे होते ज्याच्या जळीत आहे

तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!

पणजाआजानही कधी केली नाही शिरजोरी

पिढ्यान पिढ्या चाललीय मरणाची मजुरी

नशीब ही तसे लोकांच्या जळते चुलीत आहे !!

तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!

कर्ज आलं उराशी गावशीव सारच सुटलं

काळजाच्या माणसाचं माणूस पण आटल

शहरात या जिव्हाळ्याचा श्वास धुंडाळीत आहे !!

तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!

भ्रष्टचारी व्यवस्थापनाचा आजार झाला

जिकडं तिकडं नुसता गन्दा बाजार आला

धडपडतोय पुढं जायला आतडी पिळीत आहे !!

तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!

श्रीमन्तांना वाटतं यानं हव थूकलेलं चाटायला

माणूसच आहे तो त्यांना लाज हवी वाटायला

रोजंदारी द्यायला धनिक ही टाळीत आहे !!

तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!

इथ पैशाची च जात मोठी त्याचाच धर्म मोठा

भाकरी पर्यंत पोहोचायच्या हरवल्या वाटा

दिल्ली त सोडा ना त्याचा कैवारी गल्लीत आहे !!

तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!

समज आल्यावर धर्म कळला जात कळली

गरीबीच माय आपली ही खरी बात कळली

त्याच्या वेदनांचे संविधान अजुन ही वाळीत आहे !!

तसा तो-तो ही एक ओपन मधला दलीत आहे !!

-- उषातनय

तू जेव्हा बोलते ...

पाहत जावेसे वाटते तू जेव्हा बोलते ...
वाहत जावेसे वाटते तू जेव्हा बोलते !
तुझ्या डोळ्यातून पडतो पाउस असा ...
नाहत जावेसे वाटते तू जेव्हा बोलते !
तूझा एक एक शब्द असा ग सखये ...
लिहित जावेसे वाटते तू जेव्हा बोलते !
रागवलिस लटकेच कधी तू ...
साहत जावेसे वाटते तू जेव्हा बोलते !
_ उषातनय