माझ्या जीवन कवितेला प्रेरणा देणारे श्री. प्रसाद पवार व सौ. कामिनी पवार आणि सहकार्य करणारे अरविंद जगताप यांना...© 2009,prashant kendale
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९
मंगळवार, २८ जुलै, २००९
रविवार, १२ जुलै, २००९
माझे कोरडे नक्षत्र
शुक्रवार, २६ जून, २००९
रविवार, ३१ मे, २००९
मानव व्हायचे
या त्यांच्या प्रश्नान त्याच्या मनात यायचे -
आहे प्रश्न चांगला काय उत्तर द्यायचे ?
सांगू मी यांना काय मला कोण व्हायचे ?
देवही नाही ना दानव व्हायचे
खूप काही करायचे खूप काही व्हायचे
पण पहिल्यांदा मला मानव व्हायचे !!
माणसाला माणुसकी नाही ही आहे माणुसकीची खंत !
मानावताच परम धर्म नित वदले ऋषी महात्मे संत !!
जन्म झाला म्हणजे जगाव लागत
पोटाच खळग सर्वानाच भराव लागत ,
काहीना इथ गरीबीतच समाधान मानाव लागत
तर जागता जागता काहीना आभाळपण येत
आभाळपण आल म्हणुन फुगायच नसत
सागराला कधीही भूलायाच नसत
सगळ निघून जात सार काही संपत
आपल हवेत उड़न का जन्माला पुरत ?
आभाळानही आभाळपण सोडायच असत
सागराला मनसोक्त भिडायच असत
नात कधी कुणाशी तोडायच नस्त
माणसाशी माणूस नेहमी जोडायच असत !!
रक्ताच नात इथ अनेकदा फोल ठरत
मानुसकिच नात मनाहूनाही खोल ठरत
मानवतेचे गीत नव नव गायचे !!
पहिल्यांदा प्रत्येकान मानव व्हायचे !!
आपल्याला जमेल तितक कराव
इतिहासी झळकाव
जमल नाही काही चांगल माणूस नक्की व्हाव ,
कारण इत सगळ काही मिळत सगल काही होत
जगता जगता फ़क्त माणूस होण राहून जात !!
कशाला भांडायच ? कशाला लढायच ?
कशाला कुणाच रक्त काढायच ?
मानवतेचा संदेश एखाद्या मनापर्यंत जरी नेला -
नाही म्हननार कोनी "जन्मा आ़ला हेला पाणी वाहता वाहता गेला !"
म्हणतील लोक जन्म झाला
चांगला जगाला जरी जग सोडून गेला -
पण जाता जाता माणसाशी माणूस तर जोडून गेला !!
---- उषातनय
सोमवार, ११ मे, २००९
''कादवा शिवार ...."
कविता जेव्हा ...
मंगळवार, ५ मे, २००९
रस्त्यान चालताना ...
बुधवार, १५ एप्रिल, २००९
रविवार, १२ एप्रिल, २००९
एकपात्री प्रयोगात कविता सादर करताना ...
रविवार, ५ एप्रिल, २००९
तिला पाहिल्यावर ...
गुरुवार, २ एप्रिल, २००९
बुधवार, १ एप्रिल, २००९
शेतशाळा
काय होणार हो शाळा ,
शेतात आई माग राबताना
त्यांच आयुष्य झाला मळा !!
शाळेशी मनातून नात
सुट्ट सुट्ट होत गेल ,
तिच्या हातात खुरप
घट्ट घट्ट होत गेल !!
आईन मुक्त वावरू दिल नाही ,
म्हणून त्यांच्यातल पाखरू
सासर माहेर असत खर काय ते आता कळू लागल !!
रविवार, १५ मार्च, २००९
रणरणत्या ...
मंगळवार, १० मार्च, २००९
बंध तुझा माझा
दवे तृण ओलावला ,
चंद्र प्रकाशानही तो
बाई येवून न्हानला !!
आली डोळ्यात चमक
दवा तृणाची झलक
लाजे केसात गजरा
शहारे चोळी घागरा
भेट बरसून आली
मिठी सुटता सुटेना
- उषातनय
भिजलेलो ..
मी... जग ..
सोमवार, २ मार्च, २००९
रस्ता मळ्याचा
चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !
आंब्याची झाडं कुठं ती निम्बाची लहांग
चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !
-उषातनय
शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९
मातीच सूत्र ..
गुरुवार, २६ फेब्रुवारी, २००९
सारं काही मनासारख ..
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
सर्वच गोष्टी त्यासाठी जुळून याव्या लागतात
आशेसाठी अनेक निराशा गिळून घ्याव्या लागतात
पहील्याच प्रयत्नात पाखरू उडतच अस नाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
मनाला लागून आपण एवढ घ्यायच नसत
मागच विसरून सार पुढ पुढ जायच असत
हव तितक रसीकाला गाण भिडतच अस नाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
घडल नाही मनासारख मन एकट होऊन जात
त्या एका पारव्या सारख दुःखी राहून गात
देवा ..!!
तू असशील लक्ष्मी -
तर सोन्याची नाणी दे ,
पोटासाठी !!
देवा !!
तू असशील नभ -
तर मनसोक्त पाणी दे ,
ओठासाठी !!
देवा !!
तू असशील शब्द -
तर गोड गोड गाणी दे ,
चित्तासाठी !!
मंगळवार, २४ फेब्रुवारी, २००९
मी वृत्तांना ..
तिचा वळिवाचा पाऊस ..
सोमवार, २३ फेब्रुवारी, २००९
रसीकांचा कवी..
शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २००९
ज्यावेळेस..
अश्विनी आभाळ ...
गं आई !
जांभळी पिकल्या सये..
मी पाण्याच्या ...
तसाच तो शेतकर्याच्या जातीतला ..
पाटाला आलं पाणी ...
कवितेत काय ?
गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९
आवडते कवयित्रे..
आपलेच दात आपलेच ओठ ..
कशी झाली ....
पाऊस पडतो बाई ...
बुधवार, ११ फेब्रुवारी, २००९
माझ्यासाठी कविता ...
गायकी ..
तेव्हा तेव्हा माझी कविता 'गायकी 'वाढली होती !!!
---- उषातनय



