शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९

पुरस्कार स्विकारताना उषातनय ....

विख्यात कवी नारायण सुर्वे यांच्या हस्ते नाशिक कवि संस्थेचा प्रथम पुरस्कार स्विकारताना उषातनय
सोबत उपमहापौर अजय बोरस्ते ,सुरेश मेणे ,शरद पुराणिक ,सुजाता डेरे ....

उषातनय सत्कार स्विकारताना ....

नाशिक ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रथम पारितोषिक नाना साहेब सोनवणे यांच्या हस्ते स्वीकारताना उषातनय

मंगळवार, २८ जुलै, २००९

प्रसिध्द लेखक मारूती चितमपल्ली व उषातनय

दिनांक ५मे २००९ नासिक .....

मी आणि मारूती चितमपल्ली.....

मी, मारूती चितमपल्ली व सौ कामिनी पवार

रविवार, १२ जुलै, २००९

माझे कोरडे नक्षत्र

रान माझे बाभळीचे तसेच बांधही साबरीचे
ती वाढली फूलपाखरान्परी फूलात आहे !!
माझे कोरडे नक्षत्र तिच्या ध्यानी मनीही नाही
तरी मी तिच्या वळीवाचे स्वप्न पाहिले आहे !!
-उषातनय

शुक्रवार, २६ जून, २००९

दररोज ..

दररोज उठतो करतो कवितेच्या आन्घोळी ,
दारापुढेही असते माझ्या कवितेची रांगोळी !!!
-उषातनय

रविवार, ३१ मे, २००९

देवांच्या ..

देवांच्या आया बाया वर दाणे दळतात !
म्हणुन पावसाचे इथ थेंब मिळतात !!
- उषातनय

मानव व्हायचे

सगळेच विचारतात पुढे कोण व्हायचे ?

या त्यांच्या प्रश्नान त्याच्या मनात यायचे -

आहे प्रश्न चांगला काय उत्तर द्यायचे ?

सांगू मी यांना काय मला कोण व्हायचे ?

देवही नाही ना दानव व्हायचे

खूप काही करायचे खूप काही व्हायचे

पण पहिल्यांदा मला मानव व्हायचे !!

माणसाला माणुसकी नाही ही आहे माणुसकीची खंत !

मानावताच परम धर्म नित वदले ऋषी महात्मे संत !!

जन्म झाला म्हणजे जगाव लागत

पोटाच खळग सर्वानाच भराव लागत ,

काहीना इथ गरीबीतच समाधान मानाव लागत

तर जागता जागता काहीना आभाळपण येत

आभाळपण आल म्हणुन फुगायच नसत

सागराला कधीही भूलायाच नसत

सगळ निघून जात सार काही संपत

आपल हवेत उड़न का जन्माला पुरत ?

आभाळानही आभाळपण सोडायच असत

सागराला मनसोक्त भिडायच असत

नात कधी कुणाशी तोडायच नस्त

माणसाशी माणूस नेहमी जोडायच असत !!

रक्ताच नात इथ अनेकदा फोल ठरत

मानुसकिच नात मनाहूनाही खोल ठरत

मानवतेचे गीत नव नव गायचे !!

पहिल्यांदा प्रत्येकान मानव व्हायचे !!

आपल्याला जमेल तितक कराव

इतिहासी झळकाव

जमल नाही काही चांगल माणूस नक्की व्हाव ,

कारण इत सगळ काही मिळत सगल काही होत

जगता जगता फ़क्त माणूस होण राहून जात !!

कशाला भांडायच ? कशाला लढायच ?

कशाला कुणाच रक्त काढायच ?

मानवतेचा संदेश एखाद्या मनापर्यंत जरी नेला -

नाही म्हननार कोनी "जन्मा आ़ला हेला पाणी वाहता वाहता गेला !"

म्हणतील लोक जन्म झाला

चांगला जगाला जरी जग सोडून गेला -

पण जाता जाता माणसाशी माणूस तर जोडून गेला !!

---- उषातनय

सोमवार, ११ मे, २००९

देशदुत टाईम्सने घेतलेली दखल ....

( ही व खालील इमेज वाचण्यासाठी त्यावर क्लीक करावे)

''कादवा शिवार ...."

'' कादवा शिवार'' या मासिकात कवितेची पाउलवाट या सदरात ''उषातनय " यांच्या विषयी लिहिले आहे कवी रविन्द्र मालुन्जकर यांनी

कविता जेव्हा ...

कविता जेव्हा जाळल्या मी
धूर झाला अक्षरांचा !
तोच श्वास ह्रुदयात गेला
पुन्हा किलबिलाट शब्दपाखरांचा !!!
त्यांचाच नाद आता नसानसात दुमदुमत आहे-
येणारी नितळ निर्मळ कविता त्यांचीच ती करामत आहे !!!
-उषातनय

मंगळवार, ५ मे, २००९

रस्त्यान चालताना ...

रस्त्यान चालताना पाउस अचानक कसा आला ?
अंग चोरून धावलो मी माझाही मग ससा झाला !!!
---उषातनय

बुधवार, १५ एप्रिल, २००९

कवी ग्रेस व उषातनय

दि.७व८ मार्च रोजी स्टूडिओ एनकाउंटर येथे .........नासिक २००९

कवी ग्रेस यांच्यासोबत ...

श्री .प्रसाद पवार ,सौ .कामिनी पवार , समीर कुलकर्णी ......उषातनय

..........


...मुलांनी केलेली गर्दी


छन्द वर्गाचे विद्यार्थी ...व उषातनय


इन पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल ...


रविवार, १२ एप्रिल, २००९

उषातनय .... सायनिंग अँन ऑटोग्राफ...


एकपात्री प्रयोगात कविता सादर करताना ...

गटारातील कळीला पण फुलायच होत ..
आभाळाला झोका टांगून झुलायच होत ..
राज बागेतल्या कळीसारख डुलायच होत ..
न बोलताच खूप काही बोलायच होत ...
त्याकळीसारखा प्यायचा होता तिलाही वारा
मनसोक्त लुटायाचा होता सूर्य किरण सारा
पण राज माळ्या सारखा नव्हता तिला आधार
गटारातिल कन्या ती केवळ निराधार
परीमळी सख्यांचा हवा होता सहवास
पण एकट एकट आयुष्य ...तिचा होईल तसाच र्हास?
वाढता -वाढता जाई राज बागेत नजर
वाटल राज बागेतली राजेश्वरी मीही असते जर ?
दुर्गन्धीतही कस्तुरीसारख दरवळायच होत..
वादळ सार मनातल उधळायच होत ...
गटारातील कळीलापण फूलायच होत ॥
रातीच्या चांदण्या ती न्याहाळायची
अन् उरातल्या उरात स्वतःशीच हळहळायची -
त्या नभीच्या तार यातही खुलायच होत
आभाळाला झोका टांगून झुलायच होत
गटारातील कळीलापण फूलायच होत...
राजकन्या असावी ना अशीच ती होती
काळजा काळजा वर ठसावी अशीच ती होती ...
पण काहींनाच कळली तिची किंमत
सर्व जगाशी लढण्याची हिम्मत !
एकदा पहाता पहाता स्वप्न नवकोट नारायणी बनन्याच
तीच्या अभागी दुःख कुणाच्या पायदळी तुडण्याच ,
जणू कायमच्याच मरण्याच
मग काय गटारातील कळी तिथच निपचीत पडली
आकांत करून गुमान ढसाढसा रडली ....
स्वप्न ते तिचे स्वप्नच राहील का ?
गटारातील कळी कधी राज सुमन होईल का ?
कुणी ऐकेल का तिची ती अबोल भाषा ?
का जीवनात फ़क्त गटारलेल्यांसाठी स्वप्न ?
खोटया त्यांच्या आशा अभिलाषा ?
निराशा ? निराशा ?निराशा ?
-उषातनय

परिचय करताना समीर कुलकर्णी सर ,प्राचार्य ठोके सर व उषातनय


कविता सादर करताना ..सोबत कवी रविन्द्र मालुन्जकर


छंद वर्गाचे उद्घाटन करताना ,पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल


पोर्जे क्लासेस इथे कवितेस मिळालेला प्रतिसाद ...




रविवार, ५ एप्रिल, २००९

तिला पाहिल्यावर ...

तिला पाहिल्यावर मी मलाच विसरून जातो ,
शब्दमेघ माझ्यातला धुवांधार बरसून येतो !!
-उषातनय

कर्जान ..

कर्जान बापाची वणवण झाली -
फुलासारखी माय माझी कोमेजून गेली !!
-उषातनय

किती तरी ..

किती तरी गळ्यांनी
माझी कविता साठवली मनी-
शब्दानी कुबेर मी टाळ्यांचा झालो धनी !!
-उषातनय

बुधवार, १ एप्रिल, २००९

शेतशाळा

बिना बापाच्या पोरींची

काय होणार हो शाळा ,

शेतात आई माग राबताना

त्यांच आयुष्य झाला मळा !!


शाळेशी मनातून नात

सुट्ट सुट्ट होत गेल ,

तिच्या हातात खुरप

घट्ट घट्ट होत गेल !!


लांडग्यांच्या या जगात

आईन मुक्त वावरू दिल नाही ,

म्हणून त्यांच्यातल पाखरू

फारस उडत झाल नाही !!


पतीच्या घरी मन अंगही तसच जळू लागल ,

सासर माहेर असत खर काय ते आता कळू लागल !!

ती भरत राहीली पाणी
तरी सार रान करपत गेल ,
सुखच तेह्वा वाटल
आसवातून झिरपत गेल !!
मोठ्या बापाची लेक
अशा घरात नांदली नसती ,
असता बाप तिला जर
त्यान अशा घरात दिला नसती !!
तिची 'शेतशाळा 'झाली नसती -
तिला जड़ फार गेल असत ,
जीवघेण्या उन्हात तेव्हा
पावसात कोणी नेल असत ?
-उषातन

रविवार, १५ मार्च, २००९

रणरणत्या ...

रणरणत्या ग्रिष्मातही रिमझीम श्रावण होत ,
खपत्या आईबापामूळे फूलत त्याचं जीवन होत !
नव्हती कशाची चिंता होत किती लाड होते -
आईबापाचे प्रेम जणू कल्पाचे ते झाड़ होते !
बापाच्या हाताला घट्टे -आईच्या पायाला भेगा,
त्याच्यासमोर दाखवून नाही रडले कधी उगा !
मोठ मोठ होताना काही उणीवा येत गेल्या -
त्या त्याला त्याच्या कर्तृत्वाच्या जाणीवा देत आल्या !!
-उषातनय

मंगळवार, १० मार्च, २००९

बंध तुझा माझा

बंध तुझा माझा जणू

दवे
तृण ओलावला ,

चंद्र प्रकाशानही तो


बाई येवून न्हानला !!


आली डोळ्यात चमक


दवा तृणाची झलक


लाजे केसात गजरा


शहारे चोळी घागरा

गालावर लालीलाल

रंग प्रेमाला ग आला !!१!!

भेट
बरसून आली

रात शरमून गेली

हळू चंद्राच्या कानात

शुक्र चांदणी म्हणाली

तसे साजणा तुम्हीही

जवळी घ्याना मजला !!!!

मिठी
सुटता सुटेना

दूर जावेसे वाटेना

पहाट करण्यासाठी

आता सूर्यही भेटेना

मधु चंद्रामधी नभी
का तो चांदही गुंतला ?!!!!

-
उषा



भिजलेलो ..

----------भिजलेलो चिंब -----
---------------आठवणी थेंब -----------
--------'मी' आणी 'ती' लांब ----!!
-उषातनय

सखे तुला ..

सखे तुला मी इतका ग 'मीस 'करतो -
वाचत असलेल्या पुस्तकानाच 'कीस' करतो !!
-उषातनय

मी... जग ..

तिनं संसार केला ,फाटकं -लुगड़ं चोळी नेसून ,
मी जग निर्माण करतोय- फ़क्त दोन ओळींमधून !!
-उषातनय

सोमवार, २ मार्च, २००९

रस्ता मळ्याचा

घराकड़ जातो पायी-पायी उठता बसता


चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !



लागतो मळ्यात झुकझुक रूळ ओलांडून


हो कशी उडते धूळ , राही माती धडधडून


ओढ़ लागते घराची घाम पुसता पुसता

चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !

आंब्याची झाडं कुठं ती निम्बाची लहांग


मधिच लागते कुठे हो साबरिची रांग


सुरकन सरकत्या खारी दिसता दिसता !
चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !



'' संकटापासून रस्ता ठेव देवा नेटका ''


म्हसोबाच्या पायापाशी थाम्बे एक घटका


वाटावरल्या मळ्यात कुशलही पुसता पुसता !
चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !



घराकड़ जातो पायी-पायी उठता बसता
चिंचेचा,बोराटीचा अन् बाभळीचा रस्ता !


-उषातनय




शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९

मातीच सूत्र ..

प्रभाव ना मजवर कुणाचा
मी न कुणाचा मानसपुत्र आहे !!
त्यांच्यात अन् माझ्यात असेल
तर माती हे एकच सूत्र आहे !!
-उषातनय

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २००९

सारं काही मनासारख ..

पाहीजे तितक नभातून पाणी पडतच अस नाही

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

सर्वच गोष्टी त्यासाठी जुळून याव्या लागतात

आशेसाठी अनेक निराशा गिळून घ्याव्या लागतात

पहील्याच प्रयत्नात पाखरू उडतच अस नाही !!

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

मनाला लागून आपण एवढ घ्यायच नसत

मागच विसरून सार पुढ पुढ जायच असत

हव तितक रसीकाला गाण भिडतच अस नाही !!

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

घडल नाही मनासारख मन एकट होऊन जात

त्या एका पारव्या सारख दुःखी राहून गात

ठोकलेल प्रत्येक दार उघडतच अस नही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
असूनही सार काही जीवन घडतच अस नाही !!
मग नसल काही तर काही बिघडतच असनाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
पाहीजे तितक नभातून पाणी पडतच अस नाही !!
सार काही मनासारख घडतच अस नाही !!
-उषातनय

देवा ..!!

देवा !!
तू असशील लक्ष्मी -
तर सोन्याची नाणी दे ,
पोटासाठी !!
देवा !!
तू असशील नभ -
तर मनसोक्त पाणी दे ,
ओठासाठी !!
देवा !!
तू असशील शब्द -
तर गोड गोड गाणी दे ,
चित्तासाठी !!
-उषातनय

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २००९

मी वृत्तांना ..

भावनांच्या चालीवर शब्दांना प्रवृत्त केलं !!
मी व्याकरणातल्या वृत्तांना निवृत्त केलं !!
-उषातनय

तिचा वळिवाचा पाऊस ..

ती जेव्हा हसायची , गोड दिसायची !
वाटायचा तो वळिवांत न्हाला !!
पावसात भिजला , पावसात भिजला !!
हिरव्या त्या पात्यांपरी फिरूनी मातीत रुजला !
पावसात भिजला !!
कॉलेजात येताना ती सजायची ,
पाहून त्याकडे कशी लाजायची ,
गालातल्या गालात तोही हसायचा ,
मग तिच्यासाराखा तोही गोड दिसायचा -
शब्दप्रेरणा मानायचा तो तिजला !!१!! पावसात भिजला !!
तिच्याचसाठी कविता तो लिहायचा ,
प्रेमाने हृदयी तिच्या वहायचा ,
इतकी ती त्याच्या शब्दावरती मरायची ,
आत्म्यापासून वाह !अशी म्हणायची ,
समजायचा गालात तोही लाजला !!२!!पावसात भिजला !!
मना मोहणारा तिचा गंध तो ,
बनला त्याच्या कवितेचा छंद तो ,
सारखातो तिच्याकडे पहायचा ,
तो त्याच्यामध्ये कुठे रहायचा ?
हळू हळू तोही तिच्या प्रेमात पडला !!३!!पावसात भिजला !!
म्हणायचा तू डोळ्यांपुढती नसतांना -
दिसते माझी कविता मजसी रुसताना ,
विचारतो सखे माझी होशील का ?
शब्दांना सूर तुझा देशील का ?
जीवनातला हर्ष खरा आहे तू मजला !!४!! पावसात भिजला !!
साधं सुधं होतं ते कुणब्याच पोरं ,
लेक ती श्रीमंताची मोठं तीच ते घर !
परीस्थीती दोघांची नव्हती समांतर,
असे ते जन हो दोघात पडले अंतर ,
कवी तो फक्त तिच्या आठवांत जगला !!५!!पावसात भिजला !!
दुष्काळाला त्याच्या पर्जन्य होती ,
त्याच्या प्रतिभेसाठीचे चैतन्य होती ,
कशी ती सजणी त्याची त्याला भूलून गेली ?
संसारी तिच्या तीही रमून गेली -
पण प्रेम दिवा मनातील त्याच्या कधी न विझला !!६!!पावसात भिजला !!
ती जेव्हा हसायची ,गोड दिसायची -
वाटायचा तो वळिवांत न्हाला !!
हिरव्या त्या पात्यांपरी फिरूनी -
तोही जगत राहीला तोही उगत राहीला !!
--उषातनय

सोमवार, २३ फेब्रुवारी, २००९

रसीकांचा कवी..

परीक्षकांचा नाही मी तर रसींकांचा कवी आहे !!
असंख्य चांदण्यातला एकुलता एक रवी आहे !!
-- उषातनय

दोघांना ...

दोघांना एकमेकातले मित्र भेटवू !
डोळ्यातूनच आता प्रेम पत्र पाठवू !!
-- उषातनय

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २००९

ज्यावेळेस..

ज्यावेळेस माझे ओठ ,
माझ्या डोळ्यांची साथ देणार नाहीत -
त्यावेळेस मला कविता लिहीता येणार नाही !!
--उषातनय

अश्विनी आभाळ ...

अश्विनी आभाळ कुणाचं कुणाचं
दसर्याच्या सोन्याच , झेन्डूंच्या रानाच !
आभाळ अश्विनी नाखार्या ऊन्हाच ,
हसर्या पाण्याच , जान्भळ्या मनाच !
आभाळ अश्विनी तुम्बल तुम्बल -
कांद्याच्या वाफ्यातल्या पांण्यान चुम्बल!
आभाळ अश्विनी सजल उजल-
मातीत हिरव निळ पहा ते रुजल !
आभाळ अश्विनी चांदण चांदण -
बंधार्याच्या पाण्यात रातीला गोंदण!
आभाळ अश्विनी पिकांचा जड़े छंद-
पाझरे सईच्या डोळ्यातून आनंद !!
-- उषातनय

गं आई !

गं आई तुझ्या प्रेमाची किती आस आहे !
तू नसता यमाचाच प्रत्येक श्वास आहे !!
तुझा वात्सल्य चांद ना दिसला कधी -
लागले का त्याजला ग्रहण खग्रास आहे !!
बाळ तो तुझा राहतो उपाशी भुकेला -
हवासा तो भरविणार कोण घास आहे !!
आभाळ गेले पांगून नाही माती त्याची -
मिळणार सांग त्याला कुणाची कूस आहे !!
फसवीला जातोय पदोपदी जीवनी तो -
नात्यांवर जरी सर्वच ग विश्वास आहे !!
श्रावण त्याच्या आयुष्यातला संपूनी गेला ?
सारा दुर्दैवाचा त्याच्या दुष्काळ ख़ास आहे !!
-उषातनय

जांभळी पिकल्या सये..

जांभळी पिकल्या सये
वर नभी डोईवर
आनंदान मन माझं
होई कावरं बावरं !!
घोंगावतो झेपावतो
सोसाटून बाई वारा
जांभळाच्या आल्या कशा
गार बिलोरी त्या गारा !
झेलायला जांभळ ही
सये पदर तू धर !!
वाट वाट ही जांभळी
जांभळ्या ह्या दिनराती
जांभळी झाली फूल
अन् गवताची पाती !
विहीरही जांभूळली
झाली मधाळ वावर !!
पुरी जांभळाची झाली
सये मातीचीया कूस
गोड़ गोड़ साखरीचा
कसा फुललेला ऊस!
जांभळ ही चाखताना
डूले काटाळी बाभूळ !
आनंदान मन आता
माझं जांभूळ जांभूळ ! !
--उषातनय

मी पाण्याच्या ...

मी पाण्याच्या थेम्बापरी पडू कशाला ?
नाही काही माझे मग रडू कशाला ?
धाव घेती माझ्याकडे कोटी किरणे ती -
असूनी उजेड तमात दडू कशाला ?
रात जाईल तो दिवस येईल पुन्हा -
सुखाचे मग प्रेत करून गाड़ू कशाला ?
जीवन म्हणजे आहे नुसता प्रवास -
नसता कारण उगा लढू कशाला ?
देणगी निसर्गाची सौंदर्य आहे ती -
शोभत नसता मग मढू कशाला ?
प्रेमातच आहे मी देवही म्हणाला -
जगा अर्पीताना अवघडू कशाला ?
आलेलो रिक्त मी जाणार रिक्त मी -
हे आहे ते नाही म्हणून कुढू कशाला ?
-उषातनय

तसाच तो शेतकर्याच्या जातीतला ..

त्याच्या बाप दाद्याची नव्हती अशी काही दौलत ..
अन् त्याच्या जातीलाही ती मिळत नव्हती सवलत !
शिकत नव्हता शाळेत फार भाकरीची वण वण ..
अंगावर ठिगळचं नुसते .....लाज धरी त्याच मन !
शाळा सुटली ,पाटी फुटली , जगायच होत आयुष्य ...
दुष्काळलेलाच होता वर्तमान तसच राहील भविष्य !
स्वप्न एकही रंगल नाही कितीही त्यानं रंगवलं ...
नियतीनं पुन्हा पुन्हा आभाळ त्याचं पांगवलं !
सोडवला तरी होत होता पुन्हा नुसता गुंताच ...
जगत होता तो कसतरी घेऊनी चिंता खंताच !
पैसा मिळवण्यात त्याला काहीच यश आलं नाही ...
दारिद्र्य सुटलं नाही श्रीमंतीनं त्याला वशच केल नाही !
हळहळत ,तळमळत,धडधडत , राहीला त्याचा प्राण ...
डहाळून टाकल्या बाभळी तरी होत गेल बाभूळरान !
"तसाच तो होता एक शेतकर्याच्या जातीतला -
झालाच ना आभाळाचा आता नुरालाही मातीतला !!"
--उषातनय

पाटाला आलं पाणी ...

पाटाला आलं पाणी -
समाधानास्पद भाव मिळत राहिला कांद्याला ,
तर तोही जोडून घेणारय पुन्हा शेतकीच्या धंद्याला !!
---उषातनय

कवितेत काय ?

सारेच म्हणती
कवितेत काय ?
वेळ वाया जाय
फुकटचा !!
"सरस्वती आहे
ब्रह्म हे अनंत
देव भगवंत
वास करी !!
शोध ईश्वराचा
आहे ही कविता
कवी तुम्ही होता
समजेल !!
कळले तुकाला
ज्ञानाला कळले
'त्यांना 'आकळले
हो वि "ठ्ठ"ल !!
मोक्षाचे साधन
सोपे हो कविता
फिका हो सविता
तिजपुढे !!"
--उषातनय

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९

आवडते कवयित्रे..

थाटमाट नको हुंडा नको !
फक्त सुखान तू नांद !!
माझ्या कवितेला तू -
तुझ्या कवितेच ''तोरण'' बांध !!
--उषातनय

आपलेच दात आपलेच ओठ ..

हं ! आपलेच दात आपलेच ओठ ! !
तर मग आपल्याच दातांनी आपल्या ओठांच रक्त काढल्यावर -
आपल्या दातांच आपल्या ओठांशी ,
ख़रच रक्ताच नात आहे का ?
हां प्रश्न पडतो !! नाही का ?
-उषातनय

कशी झाली ....

कशी झाली बाई
वावराची कळा
कोरडा उन्हाळा
बरा होता !
जीवन एवढे
जिवासी उठावे
उन्हात पेटावे
हो त्यापेक्षा !
ऊन ते ऊनच
असते कोरडे
का हो पाणी गडे
घात करी ?
लाख लाख डोळे
ठेऊनी आकांक्षा
बघ ना रे दशा
धरणीची !
-- उषातनय

मी कुठेच ...

मी कुठेच आता जात- येत नाही !!
कवितेतून फारसा मोकळा होत नाही !!!
-- उषातनय

पाऊस पडतो बाई ...

पाउस पडतो बाई ,
वेडाऊनी धुवांधार !
नाही कुठे दिसे दिस ,
दाटे जगती अंधार !!
भिऊनिया तांडवाला,
त्या वाटाच थाम्बलेल्या !
जावे कुठे आता मग ,
पावसात तुम्बलेल्या !!
-- उषातनय

बुधवार, ११ फेब्रुवारी, २००९

ज़माना...

जमान्यानाच भरला माझ्यात द्वेष आहे !!
''प्रशांत '' नुरला आत ''अशांत ''शेष आहे !!
-- उषातनय

माझ्यासाठी कविता ...

कविता माझं व्यसन नाही
कविता माझं श्वसन आहे
जन्माच कारण माझ्या -
आयुष्याला पँशन आहे !!!
-- उषातनय

गायकी ..

जेव्हा जेव्हा कुणी माझी 'लायकी 'काढली होती -
तेव्हा तेव्हा माझी कविता 'गायकी 'वाढली होती !!!

---- उषातनय

आज पुन्हा...

आज पुन्हा पहिल्या भेटीचा होतोय आभास !
तसेच राणी पाठीवर सोड मोकळे केस !!
भिजलो होतो पावसात तूझ्या सवे हर्षाने ,
वाटे पुन्हा तो लागला प्रेमाचा श्रावण मास !!
धुंद रात होती ब्रह्म कमळाना बहर तो ,
आजही तो हुन्गू दे ब्रह्मकमळांचा सुवास !!
डोळयात पहा तू माझ्या मिसळूनिया डोळे ग ,
एकरूप होवू दे माझ्या श्वासाला तुझा श्वास !!
गुलाबाच्या छटा साऱ्या गालावर उमटू दे ,
लाजूनिया तशीच ग डोळयात गुलाबी हास !!
माझ्यासाठी ह्वावी तुझ्या केसांची घनेरी रात ,
स्वप्नातही फिरू दे हळू त्यांचीच मोरपीस !!
अल्गदची तू येना मग माझीया बाहूंत ,
अनूभऊ पुन्हा तो पहील्या भेटीचा पाऊस !!
--- उषातनय

मंगळवार, १० फेब्रुवारी, २००९

माझी कविता

ती काहींच्या' डोळयात ' येते माझी कविता !!
तरी रसीकांच्या 'गळयात' येते माझी कविता !!
----- उषातनय

विद्यापीठ !

कविते वरून घरात
ती होते हो कटकट !
आई बाप कवितेचे
तरी माझ्याविद्यापीठ !!
--उषातनय

ज्या मातीत ...

ज्या जन्मलो मातीत तिच्या
कणा कणा पासून बोलतो !
मी बोलतो तेव्हा
खोल खोल मना पासून बोलतो !!
-- उषातनय

बाबा मारू नका मला ...

तुम्हा वाटले जरी मी संकटांचा दंश आहे ,
बाबा ! मारू नका मला मी तुमचाच अंश आहे !
वाढणार मजमूळे ना तुमचा वंश आहे ,
भूषविणार जास्त मी तुमचा वन्श आहे !!
स्वतःहाच्या फूलाला कुस्कर्णार तुम्ही का ?
फूलान्वर तुमची हो किती माया आहे ,
जन्मा आधीच जीवन हे हिसकावणार का ?
लेक मी तुमची तुमचीच तर छाया आहे !!
बाबा तुम्ही ठेवाल तशीच राहीन मी
तुमच्या कल्याना आयुष्य वाहीन मी !
अंगनात जरी दुसर्याच्या फुलणार आहे ,
तिथे चांदने तुमचेच तर खुलानार आहे !
बाबा न्यारे सारे मला जग पहायचे आहे ,
ओझे तुमचे मला खरे वहायचे आहे !
हो झेप गरूडाची घेऊनी ऊड़ांयचे आहे ,
जिंकायचे आहे मला हो लढायचे आहे !!
बाबा ठरवा तुम्ही तारायचे की मारायचे आहे ,
मला खूप काही तुमच्यासाठी करायचे आहे !
गोड न्यारे सारे जग मला पण बघायचे आहे ,
बाबा ! मारू नका मला पण जगायाचे आहे !!
--- उषातनय

सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

विचारायच राहून ...

माझ्या वावरात नान्द्शील का?
विचारायच राहून गेल !!
पाणी पाणी येता येता शेतात
दुसरीकड़ वाहून गेल !!
हव तेंह्वा बार त्याला
फोड़ता आल नाही ,
हिरवळीशी नात कधी
जोङता आल नाही !!!
---उषातनय

पान पान ...

पान पान एक एक
गाळत राहीली बोर ,
आंसु तसा एक एक
ढाळत राहीली पोर !!
रणरणत्या ऊन्हासारख
तीच सासर भांडखोर ,
भेगाडलेली माती
न्याहाळाची पोर ----
कधी जमतील ढ़ग ?
कधी नाचेल मनमोर ??
---उषातनय