आभाळाला झोका टांगून झुलायच होत ..
राज बागेतल्या कळीसारख डुलायच होत ..
न बोलताच खूप काही बोलायच होत ...
त्याकळीसारखा प्यायचा होता तिलाही वारा
मनसोक्त लुटायाचा होता सूर्य किरण सारा
पण राज माळ्या सारखा नव्हता तिला आधार
गटारातिल कन्या ती केवळ निराधार
परीमळी सख्यांचा हवा होता सहवास
पण एकट एकट आयुष्य ...तिचा होईल तसाच र्हास?
वाढता -वाढता जाई राज बागेत नजर
वाटल राज बागेतली राजेश्वरी मीही असते जर ?
दुर्गन्धीतही कस्तुरीसारख दरवळायच होत..
वादळ सार मनातल उधळायच होत ...
गटारातील कळीलापण फूलायच होत ॥
रातीच्या चांदण्या ती न्याहाळायची
अन् उरातल्या उरात स्वतःशीच हळहळायची -
त्या नभीच्या तार यातही खुलायच होत
आभाळाला झोका टांगून झुलायच होत
गटारातील कळीलापण फूलायच होत...
राजकन्या असावी ना अशीच ती होती
काळजा काळजा वर ठसावी अशीच ती होती ...
पण काहींनाच कळली तिची किंमत
सर्व जगाशी लढण्याची हिम्मत !
एकदा पहाता पहाता स्वप्न नवकोट नारायणी बनन्याच
तीच्या अभागी दुःख कुणाच्या पायदळी तुडण्याच ,
जणू कायमच्याच मरण्याच
मग काय गटारातील कळी तिथच निपचीत पडली
आकांत करून गुमान ढसाढसा रडली ....
स्वप्न ते तिचे स्वप्नच राहील का ?
गटारातील कळी कधी राज सुमन होईल का ?
कुणी ऐकेल का तिची ती अबोल भाषा ?
का जीवनात फ़क्त गटारलेल्यांसाठी स्वप्न ?
खोटया त्यांच्या आशा अभिलाषा ?
निराशा ? निराशा ?निराशा ?
-उषातनय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा